Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना बजावली नोटीस

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार..
प्रतिनिधी......

 

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व भागात   27 ऑगस्ट 2025 रोजी एका चार मजली इमारतीचा  एक भाग कोसळून 17  जणांचा मृत्यू आणि 8  जण जखमी झाल्याच्या माध्यमातील वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे. ही इमारत अनधिकृत होती आणि सुमारे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. मात्र तेथील  रहिवासी वसई-विरार शहर महानगरपालिकेला  कर भरत होतेकारण त्यांना असे वाटत होते की ही इमारत नोटरीकृत कागदपत्रांनुसार अधिकृत आहे.

आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे कीजर माध्यमांमधील वृत्तातला   मजकूर खरा असेल तर तो मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर प्रश्न उपस्थित करतो. म्हणूनत्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे आणि दोन आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

28 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांमधील वृत्तानुसारवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे कीनिकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे इमारत कोसळली असावी. रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी तीन नोटीसा पाठवण्यात आल्या होत्यापरंतु सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वृत्तानुसारइमारतीत सुमारे 50 फ्लॅट आणि अर्धा डझन दुकाने होतीत्यापैकी इमारतीचा मागील भागज्यामध्ये सुमारे 12 फ्लॅट होते तो कोसळला.

Post a Comment

0 Comments