मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
प्रतिनिधी...
आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “पहिला बुद्ध रत्न पुरस्कार” महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण संदेश दिला.
भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, करुणा, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग हा आजच्या आधुनिक समाजासाठीही तितकाच प्रेरणादायी आहे. बुद्धांच्या विचारांनी जगाला शांततेचा आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला. या तत्वज्ञानाचा प्रभाव समाजजीवनात अधिक दृढ व्हावा, यासाठी विविध स्तरावर कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधा विकास, शहरी सुधारणा, तसेच दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे त्यांनी जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. “सबका साथ, सबका विकास” या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी शासनकारभारात समतोल आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन जपला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि संवेदनशील दृष्टिकोन हेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, बुद्धांच्या विचारांशी सुसंगत असलेले कार्य आणि समाजासाठीची त्यांची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना “बुद्ध रत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

Post a Comment
0 Comments