Type Here to Get Search Results !

मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आज साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांना "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारकडे ठाम मागणी करण्यात आली.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे...

या मागणीच्या पार्श्वभूमीवर मा रमेशदादा बागवे ( संस्थापक अध्यक्ष मा ए आं महा, राज्य ) यांच्या आदेशानुसार  धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनात मातंग समाजातील बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्या मागणीसाठी पुढाकार घेतला. 



या वेळी मा. अविनाशजी बागवे , ( कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन महा, राज्य, )  मा आरुणजी गायकवाड सेक्रेटरी महा, राज्य   मा. राजश्रीताई अडसुळ अध्यक्षा, महिला आघाडी पुणे शहर, मा. रमेशजी सकट, शहर उपाध्यक्ष, मा दयानंदजी अडागळे  उपाध्यक्ष, मा  लक्ष्मीताई पवारताई , स्वागताध्यक्षा, पुणे शहर जिल्हा मातंग समाज मा.दिपकजी कसबे, सचिव पुणे जिल्हा मातंग समाज, मा सुनिल बावकर , प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया, मा संजयजी साठे अध्यक्ष युवक आघाडी, मा नारायण पाटोळे उपाध्यक्ष पुणे शहर मा बुवा कांबळे , उपाध्यक्ष पुणे सोशल मीडिया, मा ज्ञानेश्वर साठे,  मा. रमाकांत साठे,  मा दत्ताभाऊ झोबाडे सेक्रेटरी सोशल मीडिया  पुणे शहर ,  सुनील साळवे , हुसेन शेख , संतोष शिंदे , दिपक गायकवाड , भारत बाबर , व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



आंदोलनाचे आयोजक – मा. दिगंबर जोगदंडजी जिल्हा अध्यक्ष पुणे  व इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


अण्णा भाऊ साठेंनी दलित, वंचित, श्रमिक आणि कष्टकरी वर्गासाठी केलेले कार्य हे भारतीय लोकशाही आणि साहित्यविश्वाला दिशा देणारे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे ही संपूर्ण समाजाची आणि देशाची जबाबदारी आहे.


Post a Comment

0 Comments