Type Here to Get Search Results !

आयुष्यात कष्टाशिवाय यश नाही* लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके; एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे, दि. २७- भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा देश आहे. ही विविधता भाषा, धर्म, संस्कृती, वयोमान या सर्व पैलूंवर फूलत जाते. सार्वभौम भारताच्या सध्याच्या प्रगतीत युवकांचे योगदान खूप मोठे आहे, व या युवकांना मला सांगायचे आहे की, भारताला विकसित करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत व कायम लक्षात ठेवा आयुष्यात कष्टाशिवाय यश मिळत नाही, असा सल्ला मत लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांनी दिला. ते एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.



यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.



विश्‍वराजबागेतील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात यंदाचा प्राजसत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून प्रसंगी उपस्थिती सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.सुराज भोयार यांनी आगीच्या चित्तथरारक कसरती दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.



याप्रसंगी बोलताना, प्रा.डॉ. कराड म्हणाले, आजचा हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण काढण्याचा, त्यांना नमन करण्याचा आहे. गतवर्ष भारतीय लोकशाहीसाठी उल्लेखनिय ठरले व अनेक आघाड्यांवर भारताने प्रगती केली आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या प्रभू श्रीरांमांच्या अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने जगाचे लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

-------------------------------

*बिना मेहनत के जीवन में सफलता नहीं मिलती*

लेफ्टिनेंट जनरल मिलिंद भुरके; एमआईटी एडीटी यूनिवर्सिटी में गणतंत्र दिवस का उत्साह

पुणे, दि. 27- भारत वास्तव में विविधता में एकता का देश है। यह विविधता भाषा, धर्म, संस्कृति, उम्र सभी पहलुओं में पनपती है। संप्रभु भारत की वर्तमान प्रगति में युवाओं का योगदान बहुत बड़ा है, और मैं इन युवाओं को बताना चाहता हूं कि आपको भारत को विकसित करने के लिए आपकों कड़ी मेहनत करनी होगी और हमेशा याद रखें कि, कड़ी मेहनत के बिना जीवन में कोई सफलता नहीं है । ऐसी सलाह लेफ्टिनेंट जनरल मिलिंद भुरके ने दी। वह विश्वराजबाग स्थित एमआईटी यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिजाइन एंड टेक्नोलॉजी में 75वें गणतंत्र दिवस के मौके पर आयोजित कार्यक्रम में बोल रहे थे।

एमआईटी एडीटी विश्वविद्यालय के कुलपति और कार्यकारी अध्यक्ष प्रो. डॉ. मंगेश कराड, प्र.कुलपति डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, रजिस्ट्रार डॉ. महेश चोपड़े, मॅनेट के प्राचार्य कैप्टन प्रेरित मिश्रा और अन्य गणमान्य  इस अवसर पर उपस्थित थे।

इस वर्ष का गणतंत्र दिवस विश्वराजबाग स्थित मानेट बिल्डिंग के प्रांगण में बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। कार्यक्रम की शुरुआत लेफ्टिनेंट जनरल मिलिंद भुरके द्वारा ध्वजारोहण समारोह के साथ हुई। इसके बाद छात्रों ने नृत्य और देशभक्ति गीत प्रस्तुत कर इस अवसर पर उपस्थित सभी लोगों को मंत्रमुग्ध कर दिया। इस अवसर पर विद्यार्थी कल्याण विभाग के सहायक निदेशक डॉ. सूरज भोयर ने मनमोहक अग्नि व्यायाम दिखाकर सभी का ध्यान आकर्षित किया।

इस अवसर पर बोलते हुए प्रोफेसर डॉ. कराड ने कहा, आज का दिन उन स्वतंत्रता सेनानियों को याद करने और उन्हें श्रद्धांजलि देने का दिन है जिन्होंने भारत के स्वतंत्रता संग्राम में अपने प्राणों की आहुति दी। पिछला वर्ष भारतीय लोकतंत्र के लिए उल्लेखनीय रहा है और भारत ने कई मोर्चों पर प्रगति की है। साथ ही उन्होंने कहा कि अयोध्या में भगवान श्री राम के भव्य राज्याभिषेक समारोह ने दुनिया का ध्यान आकर्षित किया है।

कार्यक्रम का परिचय, संचालन एवं धन्यवाद ज्ञापन विश्वविद्यालय के विद्यार्थियों द्वारा किया गया।

Post a Comment

0 Comments